2019 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांनी सांगितले होते की वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की शेतकऱ्यांचा 7-12 उतारा कोरा करू परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि 7-12 कोरा करणे तर दूरच उलट शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच कृषी निविष्ठांच्या किंमती वाढल्या आहेत तर 7-12 कोरा होण्याऐवजी शेतकऱ्यांवर कर्जाचे बोजे वाढत चालले आहे गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात म्हणजे 8-9 रुपये किलोने विकला जात आहे परंतु कांद्याचे भाव वाढले पाहिजे यासाठी ना राज्य सरकारचे लक्ष आहे ना केंद्र सरकारचे लक्ष आहे शेतकरी मात्र आपापल्या परीने आर्थिक संकटाला तोंड देत आहे
सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांचा खरेदी केलेल्या कांद्याला काल 16 एप्रिल रोजी लासलगाव बाजार समितीत काही मोजक्याच वाहनांमधील कांद्याला सरासरी 11 रूपये दर मिळाला आहे या दरात उत्पादन खर्चही भरून निघणार नाही बाजार समितीसोबतच लवकरच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या अंतर्गत नाफेडकडून खरेदी करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला जोपर्यंत 30 रुपये प्रति किलो दर मिळत नाही तोपर्यंत नाफेडची कांदा खरेदी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून बंद पाडण्यात येईल.
भारत दिघोळे
संस्थापक अध्यक्ष
9921889658
-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

