ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस कष्ट करून वाढतात. असे असताना अनेक कारखाने हे उसाच्या वजनात झोल करत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले तसे त्यांनी सिद्ध देखील केले आहे. यामुळे हे वजनकाटे ऑनलाइन करण्याची मागणी केली जात होती.
कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस मोजतांना काटामारी केला जात असल्याचा आरोप केला जातो. यासाठी शेतकरी संघटनांकडून देखील आंदोलन करण्यात आली आहेत. आता याबाबत मोठा निर्णय घेतला असून पुढील हंगामापासून वजन काटे हे डिजिटल केले जाणार आहेत.
यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या मते गेल्या वर्षी कारखानदारांनी जी काटामारी केली त्यातून साडेचार कोटींची साखर तयार करण्यात आली. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे..
काटामारी करून साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या उसावर दरोडा घालतात, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कारखानदार उसाच्या वजनात झोल करत असतील त्यांना आळा बसेल.
वजन काटे डिजिटल करण्याच्या या शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील लाखों ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे त्यांच्या हक्काचे चार पैसे मिळणार आहेत.