- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक घोषणा केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी ई-पीक पाहणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. जी आता तात्पुरती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रद्द केली आहे.यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ही अट रद्द केल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण ही ई-पीक पाहणी प्रक्रिया करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे याबाबत शेतकरी अनेकदा मागणी करत होते. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत ही घोषणा केली आहे. ही अट तात्पुरती हटवल्यानंतर शेतकऱ्यांच्या ही अडचण दूर होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळण्यास मदत होणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे झालेल्या…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/10/2022 माजलगाव — क्विंटल 8597 3800 5011 4700 राहूरी -वांबोरी — क्विंटल 144 4500 5201 4850 राहता — क्विंटल 26 4100 4801 4520 चाकूर डॅमेज क्विंटल 10 4011 4501 4256 अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 226 2001 5026 3001 लातूर पिवळा क्विंटल 10565 4990 5400 5200 जालना पिवळा क्विंटल 13900 3500 5150 4700 पैठण पिवळा क्विंटल 25 4046 4590 4531 परतूर पिवळा क्विंटल 525 4400 5151 5100 केज पिवळा क्विंटल 1471 4600 5200 5000 चाकूर पिवळा क्विंटल 583 4501 5461 5088…
राज्यभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. आज (26 ऑक्टोबर) दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आला आहे. दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा महत्त्वाचा मानला जातो. याच शुभमुहूर्तावर सांगलीत हळद आणि गुळ सौद्याचा शुभारंभ करण्यात आला. आजच्या या शुभ मुहूर्तावर हळदीला 8 हजार रुपयांचा दर मिळाला तर गुळाला 4 हजार 200 रुपयांचा दर मिळाला आहे. सौद्याच्या प्रारंभीच हळदीला आठ हजार रुपयांचा दर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पाडव्याच्या मुहूर्तावर हळद आणि गूळाच्या सौद्यांना सुरुवात झाली. मार्केट यार्डमध्ये हळदीच्या पोत्यांचं यावेली पूजन करुन या वर्षीच्या हळद सौद्यास मोठ्या उत्साहात प्रारंभकरण्यात आला. सौद्याच्या प्रारंभीच हळदीला आठ हजार रुपये प्रती…
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण (Crude Oil Price) सुरू होती. या घसरणीला ब्रेक लागला असून कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत. तर, दुसरीकडे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर (Petrol Diesel Price Today) केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. देशात मागील पाच महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत. कच्च्या तेलाच्या दरात तेजी काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रति बॅरल इतका झाला होता. कच्च्या तेलाच्या दरात होणारी घसरण थांबण्यासाठी तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नोव्हेंबर महिन्यापासून अंमलात येणार आहे. गुरुवारी…
हल्ली लग्नसमारंभ, मोठ्या सभांसाठी ड्रोनचा वापर वाढला आहे. पण ड्रोनचा वापर एवढाच मर्यादीत नाही. ड्रोनचा वापर शेतात केल्यास लाखोच्या संख्येने रोजगार निर्मिती तर होईलच. पण खर्च वाचून शेतीत अमुलाग्र बदल होतील असा दावा करण्यात येत आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या एका अहवालात याविषयीचा दावा करण्यात आला आहे. मंगळवारी फोरमने याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, ड्रोनचा शेतात वापर वाढवल्यास त्याचा फायदा दिसून येईल. केंद्र सरकारने शेतात ड्रोन वापरास प्रोत्साहन दिल्यास देशाचे सकल उत्पन्नात (GDP) वाढ होऊ शकते. देशाचा जीडीपी(GDP) एक ते दीड टक्क्यांनी वाढू शकतो. एवढेच नाही तर फोरमच्या दाव्यानुसार, या माध्यमातून स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मितीही होऊ शकते. ड्रोनचा वापर वाढल्यास यासंबंधीच्या तांत्रिक बाबींची पुर्तता…
पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. विनायक निम्हण यांना औंध जिव्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे समोर आले. अंत्यविधी रात्री ९ वाजता पाषाण स्मशानभूमी मध्ये होणार आहे
रासायनिक खते हा शेतकऱ्यांशी निगडीत एक महत्वाची बाब असून रासायनिक खतांवर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचे उत्पादन अवलंबून असते. आतापर्यंत आपण अलीकडील परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी बोगस खतांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतो व अशा बोगस खतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते व पिकांवर विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर खतांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली असून या रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी ती खूप महत्त्वाचे आहे. राज्यात 19 कंपन्यांच्या खतांवर राज्यात बंदी यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार कृषी सहसंचालक यांनी तब्बल 19 कंपनीच्या खताचे नमुने अप्रमाणित आढल्याने त्यांच्यावर बंदी घातली असून संबंधित खते शेतकरी बंधुंनी खरेदी करू नये, अशा संबंधीचे आवाहन देखील करण्यात…
डायबँक आणि फळ सडणेडायबँक आणि फळ सडणे हा रोग कोरडवाहू तसेच ओलिताखालील अशा दोन्ही मिरची पिकांमध्ये आढळून येतो. या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होऊन पिकाची फांदी शेंड्याकडून खालच्या दिशेने वाळत येते. नुकसानग्रस्त फांदीची साल प्रथम करड्या रंगाची होऊन फांदीवर घट्ट काळ्या रंगाचे ठिपके आढळतात. पक्र झालेल्या फळावर गोलाकार किंवा अंडाकृती काळे ठिपके आढळतात. नुकसानग्रस्त फळे सुकतात आणि वाळतात. नियंत्रण हा रोग बियाण्यापासून होत असल्यामुळे रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा. मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रोगग्रस्त फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात. बुरशीजन्य रोग आढळून आल्यानंतर २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ३o ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड १o…
सुर्यफुल हे महाराष्ट्रातील महत्वाचे तेलवर्गीय पिक आहे. हे पिक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे. हे पीक पावसाचा ताण ब-याच प्रमाणात सहन करू शकते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित व संकरित वाणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे._ जमीन _सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही._ पूर्वमशागत _जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात._ पेरणीची वेळ _उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये पेरणी…
सततचा पाऊस व अचानक पडणारे तीव्र ऊन यामुळे जमिनीला वाफसा येत नाही. तीव्र उन्हामुळे माती तापून उष्ण वाफ बाहेर पडते. या वाफेचा आघात प्रथम मुळांवर होतो व नंतर पानावर व फळांवर होतो. मुळे कोमजून मातीतून अन्नद्रव्यांची उचल खंडित होते व पानांवर विविध प्रकारच्या विकृती दिसू लागतात. परिणामी फुलगळ व लागलेली फळे विकृत होऊन गळून पडतात. असे घडत असताना उत्पादक अभ्यास न करता फवारणी किंवा खते देत असतात. यामुळे देखील उत्पादनात घट होत असते. मी शेतकरी बांधवांना यावर काही उपाय सुचवतो त्यांचा नक्की फायदा होईल. पीक कुठलेही असो उपाय समान *उपाययोजना* 1)बुरशीनाशकांची फवारणी ph काढून सकाळी करावी. 2)कीटकनाशकांची फवारणी ph काढून…
