- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे. दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत.काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे अस त्याने या पत्रात म्हणलं आहे. हिंगोली : दरवर्षी होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्य सोबतच कुटुंबातील लहान चिमुकल्यांवर सुद्धा होत आहे. अनेक बाबींपासून लहान ज्यांना सुविधा त्याचे पाहिजे तसे लाड बळीराजा आपल्या मुलांचे पुरवू शकत नाही कारण त्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे…
क्रिसेंडो वर्ल्डवाईडच्या वतीने “ट्रेड मिशन टू इंडीया”चे आयोजन पुणे – पुण्यातील क्रिसेंडो वर्ल्डवाईड या कंपनीने भारतीय व्यावसायिकांसाठी तुर्की कंपन्यांबरोबर भागीदारीची संधी निर्माण केली आहे. तुर्की देशातील निर्यातीची एकमेव महत्वाची संघटना टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्ली (TİM)च्या साथीने ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत “ट्रेड मिशन टू इंडीया” या व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील लोअर परेल येथील हॉटेल सेंट रेजिस येथे ही परिषद होणार आहे. या व्यापारी परिषदेमध्ये फर्निचर, मार्बल, इंटिरियर डेकोरेटर्स, नर्सरी, सेंद्रिय उत्पादने आणि तुर्कीच्या मांस आणि जतन केलेले अन्न आणि बांधकाम कंपन्यांना भारता विस्तार करण्यासाठी उत्सुक आहेत. या कार्यक्रमाद्वारे भारतीय खरेदीदार, आयातदार आणि…
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादवउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव त्याच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी दिली आहे. त्यांच्यावर ग्रुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. ” माझे आदरणीय पिता आणि सर्वांचे नेते या जगात राहिले नाहीत,” असे अखिलेश यादव यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. मुलायमसिंह यादव यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलायमसिंह यांना यूरिन इन्फेक्शन झाले आहे. त्यांना एक महिन्याआधीच…
हवामान विभागाकडून यूपी-उत्तराखंडसह २० राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नोरू चक्रीवादळामुळे पाऊस भारतात महिनाभर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच परतीच्या वाटेवर असलेला मान्सून, अद्याप उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये सातत्याने कोसळत आहे. हवामान विभागाकडून यूपी-उत्तराखंडसह २० राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नोरू चक्रीवादळामुळे पाऊस भारतात महिनाभर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. चक्रीवादळचा प्रभाव ओसरत असला तरी, चक्रीवादळाचे ठिकाण पुढचे काही दिवस जिथे आहे तिथेच रहाणार आहे. नैऋत्य मान्सून माघारीच्या वाटेवर असताना हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. यामुळे मध्य भारत आणि पश्चिम भारताच्या पश्चिम भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही…
ट्रॅक्टरचे व्यवस्थापन हे कामाच्या तासावरून केले जाते. ट्रॅक्टरचा वापर करताना चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. सर्व चाकांचे नट बोल्ट्स तपासून आवश्यकतेनुसार आवळून घ्यावेत. गिअर बॉक्समधील तेलाची पातळी तपासावी. ब्रेक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे. योग्य व्यवस्थापनातून ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढविता येते, तसेच इंधनामध्ये बचत करणे शक्य आहे. 1) दर 8 ते 10 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी – अ) इंजिनमधील (सम्पमधील) व एअर क्लिनरमधील तेलाची पातळी तपासावी. ब) रेडिएटर व बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासावी. क) जर ट्रॅक्टरचे काम धुळीमध्ये असेल तर एअर क्लिनरमधील तेल बदलावे. ड) डिझेल लिकेज आहे का ते पाहावे. 2) दर 50 ते…
ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसलाय.दिवाळीआधी डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. तूर डाळीचा भाव गेल्या आठवड्याभरात चार ते पाच रुपयांनी वाढलाय.त्यासोबत उडीद डाळ आणि खाद्य तेलाच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आलीय. ठोक बाजारसह किरकोळ बाजारावरही डाळींच्या किंमतींचा परिणाम जाणवू लागला आहे. उत्पादन घटण्याच्या भीतीने डाळींची दरवाढ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या आठ दिवसांमध्ये तूर डाळीच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ झाली. सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा 110 रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 125 ते 130 रुपये किलो इतकी झाली आहे. उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलो इतक्या दराने मिळत…
भारतीय हवामान विभागच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुख्यतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे प्रचंड महत्वाचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पावसाच्या वातावरणामुळे काढणीला आलेल्या पिकांची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. तसेच पिकांना पाणी देण्यापूर्वी व औषधे फवारण्यापूर्वी हवामान आधारित पीक निहाय कृषी सल्ला जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. शेतकऱ्यांनी पिकाची घ्यावी काळजी • परिपक्व अवस्थेतीलकापणी केलेला सोयाबीन व इतर शेतमाल प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा व तयार शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. • तसेच कृषी रसायनांच्या फवारणीचे कामे, उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील 3 ते 4 दिवस…
महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. मराठवाडा व विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे येथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते.कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. कापसाचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. सरकी आणि रुईसाठी गॉसिपियम हिर्सुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजाती वापरल्या जातात. याच्या यशस्वी उत्पादनातील सर्वात मोठी अडचण म्हणजे गुलाबी बोंड अळी. गुलाबी बोंड अळीचे शास्त्रीय नाव हे पेक्टिनोफोरा गॉसिपिएला असुन ती कपाशीवरील जगातील सर्वात महत्त्वाची किडी आहे. महाराष्ट्रातील कापसावर या अळीच्या प्रादुर्भावाचा अहवाल ईटीएलच्या वर नोंदवला गेला आहे आणि २०१७-१८ मध्ये ३३ % पीक नुकसान या अळीने केले आहे. ही अळी…
वाफसा म्हणजे काय : – वाफसा जमिनीच्या पृष्ठभागाखालि मुळयाच्या परिसरात , दोन माती कणाच्या मध्ये ज्या पोकळया असतात त्या पोकळयामध्ये पाण्याचे अस्तित्व नको तर पोकळयामध्ये 50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे सन्मिश्रन हवे . या एकूण स्थितिला *” वाफसा”* म्हणतात . जेव्हा आपण सिंचनाचे पाणी देतो आणि पुढे 15 दिवस पाणी ( पाळी ) येणार नाही म्हणुन ‘ कुंभस्नान ‘ घालतो त्यामुळे दोन मातीच्या कणामध्ये ज्या पोकळया असतात त्या सर्व पाण्याने भरून जातात व तेथील हवा निघुन जाते . . वाफा पाण्याने गच्च भरतो तेव्हा बुड- बुड असा जो आवाज येतो तो त्या निघुन जाणाऱ्या हवेचा असतो…
“वाघ्या घेवड्याला जीआय मानांकन मिळाले खरे पण बाजारातील प्रश्न काही सुटले नाहीत. चीन, पोलंड, युगांडा आदी देशातून दिल्लीसह उत्तर भारतात राजम्याची मोठ्याप्रमाणात आयात झालीय. म्हणून कोरेगाव, खटाव, वडूज आदी विभागात भाव पडलेत. वडूजसारखे बाजार तर बंद ठेवलेत. कारण मागणी नाही, आणि वाढत्या आयातीमुळे बाजाराची दिशा स्पष्ट नाही. शेतकऱ्यांनी माल कुठे विकावा, …ऐन सणासुदीत वाघ्या घेवडा उत्पादकांची परवड सुरू आहे…” अनिल पवार सांगत होते. उंबरडे, वडूजचे अनिल पवार हे शेतकरी आहेत, शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आहेत. “सात आठ हजार क्विंटलपर्यंत भाव घटलेत. अकरा-बारा हजारावरून भाव घटलते. अशा स्थितीत कोल्ड स्टोरेज मात्र फूल होताहेत. कोट्यावधी रुपयांचे स्टॉक लागताहेत. …इकडे सर्व सामान्य…
