- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
राज्य कांदा संघटनेचा फुकटच्या भावाने नाफेडला कांदा देण्यास पुर्ण विरोध राहील असे विधान महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदीचे टेंडर मिळालेल्या फेडरेशनच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी थेट शेतकऱ्यांचा कांद्याला द्यायचा आजचा प्रती क्विंटलचा भाव पुढीलप्रमाणे , नाशिक व धुळे- 121 रू , अहमदनगर व बीड- 1051 रू उस्मानाबाद- 1008 रु ,औरंगाबाद- 991 रू पुणे- 964 रु वरील भाव हा उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाफेडच्या या भावात कांदा खरेदीला पुर्णपणे विरोध असून पुढील 2 ते 3 दिवसांत नाफेडचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांना जाब विचारला जाणार…
कांद्याला कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. साधा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने उसनवारीने घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करायची या विवंचनेत असलेल्या खुंटेवाडी ता. देवळा येथील महेंद्र सुरेश भामरे (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील महेंद्र सुरेश भामरे उर्फ गोटू या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन केल्याने त्याचा रविवार (ता. १) रोजी मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी वर्गात व्यवस्थेविरुद्ध संतापाची लाट उसळली असून या शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची मिळावी अशी मागणी होत आहे. कष्ट केलेल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही वसूल होत…
निवडणूक म्हटलं की जनतेचे प्रतिनिधी, मते आणि आश्वासन आलेच ! पण हे सर्व आटोपल्यावर जो जनतेची सेवा करतो तोच खरा जनतेचा प्रतिनिधी असतो. हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दाखवून दिले आहे. आमदार रोहित पवार युवा कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे आमदार आहेत. ते त्यांच्या मतदारसंघात लोकांना नेहमीच मदत देण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांना मदत करत असतात. याशिवाय, रोहित पवार (Rohit Pawar) राज्यातील जनतेशी कनेक्ट राहण्यासाठी, अनेक गोष्टींबद्दलची माहिती देण्यासाठी, काही महत्वाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर कायम सक्रीय राहतात. आता त्यांची एक पोस्ट शोधलं मीडियावर अशीच चर्चेत आली आहे ज्या मुळे रोहित पवार याच्यावर…
एकीकडे विजय मल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी बॅंकाचे हजारो कोटी बुडवून परदेशात पसार झाले आहे, तर दुसरीकडे एका शेतकऱ्याला केवळ ३१ पैसे थकबाकी असल्याने स्टेट बॅंक ऑफ इंडियाने नो ड्युस ( कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला ) देण्यास नकार दिल्याची घटना गुजरातच्या अहमहाबाद येथे घडली आहे. न्यायालयाने याबाबत एसबीआयला खडे बोल सुनावले आहेत. अहमदाबाद शहराजवळ संभाजी पाशाभाई यांची जमीन होती. ती त्यांनी राकेश व मनोज वर्मा यांना विकली. या जमिनीवर शेतीचे कर्ज होते. त्यामुळे ही जमीन वर्मा बंधूंच्या नावावर होत नव्हती. वर्मा बंधूनी ही थकबाकी भरण्याची तयारी दाखवली. पण याबाबत पुढे काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून वर्मा बंधू न्यायालयात गेले. न्यायालयात…
कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि जर्मनीच्या आर्थिक सहकार आणि विकास मंत्री स्वेन्जा शुल्झ यांनी आभासी बैठकीत यासंदर्भातील घोषणेवर स्वाक्षरी केली, असे अधिकृत घोषणा केली आहे भारत आणि जर्मनीने सोमवारी कृषी-परिस्थिती आणि कृषी क्षेत्रातील नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन यावर सहकार्य करण्यास सहमती दर्शवली, नंतरच्या अशा उपक्रमांसाठी 2025 पर्यंत 300 दशलक्ष युरो पर्यंत सवलतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा त्यांचा हेतू आहे. कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि जर्मनीच्या आर्थिक सहकार आणि विकास मंत्री स्वेन्जा शुल्झ यांनी आभासी बैठकीत यासंदर्भातील घोषणेवर स्वाक्षरी केली, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. करारानुसार, दोन्ही राष्ट्रांनी शेतकऱ्यांसह शैक्षणिक संस्था आणि अभ्यासक यांच्यातील संयुक्त संशोधन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नवकल्पना यांना…
एप्रिलमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 7.83% पर्यंत वाढला आहे, असे CMIE डेटा दर्शवत आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर मार्चमधील 8.28 टक्क्यांच्या तुलनेत 9.22 टक्क्यांनी जास्त होता, असे सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीचा दर मार्चमध्ये 7.60 टक्क्यांवरून एप्रिलमध्ये 7.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर मार्चमध्ये 8.28 टक्क्यांच्या तुलनेत 9.22 टक्क्यांनी जास्त होता, असे सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले. ग्रामीण भागात एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर 7.18 टक्के होता, जो मागील महिन्यात 7.29 टक्के होता. हरियाणामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक 34.5 टक्के होता, त्यानंतर राजस्थानमध्ये 28.8 टक्के, बिहारमध्ये 21.1 टक्के आणि जम्मू…
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत. कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात वर्षानुवर्षे साठतात. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, क्षार जमिनीवर साठत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनतात. हा जमिनी सुधारण्यासाठी सामूहिक उपाययोजनांची गरज आहे. सिंचन क्षेत्रातील भारी काळ्या आणि नदीकाठच्या पोयटायुक्त जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार आणि विनिमय सोडिअमचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या जमिनी क्षार व चोपण झाल्या आहेत. नदीकाठच्या आणि कालवा सिंचन क्षेत्रातील क्षार व चोपणयुक्त जमिनीच्या भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मावर अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. हे गुणधर्म सुधरविण्यासाठी निचऱ्याच्या माध्यमातून अतिरिक्त…
साखर उद्योगातील अग्रगण्य व्यक्ती असलेल्या अबिनाश वर्मा यांनी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे महासंचालक म्हणून अनपेक्षितपणे राजीनामा दिला आहे, असे उत्पादकांच्या संस्थेने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या महासंचालकांनी अनपेक्षितपणे राजीनामा दिला आहे 1 ऑक्टोबर 2022 पासून, सध्याचा साखर हंगाम सुरू झाला तेव्हापासून, भारतीय कारखान्यांनी विक्रमी 8 दशलक्ष टन स्वीटनर निर्यात करण्यासाठी करार केले आहेत. साखर उद्योगातील अग्रगण्य व्यक्ती असलेल्या अबिनाश वर्मा यांनी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे महासंचालक म्हणून अनपेक्षितपणे राजीनामा दिला आहे, असे उत्पादकांच्या संस्थेने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे. स्वीटनरचा जगातील नंबर 1 ग्राहक आणि ब्राझीलनंतरचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून, जागतिक साखर…
“माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैंजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके , मेळवीन.” अश्या शब्दसुमनांची उधळण करणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलीं या मराठी मुलखाबद्दल आशा शब्दांत भाषेची थोरवी गातात, अनेक संत महात्म्यांची पुण्यभूमी म्हणजे हा महाराष्ट्र. मोघलशाही, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाहीला चारीमुंड्या चित करणारे शककर्ते “स्वराज्य” निर्माते श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी सर्वधर्मसमभाव, विश्वबंधुत्वाची शिकवण जिथं रुजवली तोच हा महाराष्ट्र, धर्मासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र, देशाच्या स्वतंत्र्य युद्धात अगणित क्रांतिकारक , स्वातंत्र्य सेनानी घडवणारा हाच तो महाराष्ट्र. देशात स्वतःची ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक , वैज्ञानिक, साहित्यिक,सामाजिक, क्रिडा यातील उत्तुंग शिखरे गाठत स्वतःचा दबदबा…
पशुखाद्याच्या किमती एका वर्षात विक्रमी उच्चांक गाठल्या होत्या त्यामुळे केंद्राने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पोल्ट्री उद्योगाला मदत करण्यासाठी 1.2 दशलक्ष टन GM सोयामीलच्या पहिल्या शिपमेंटला परवानगी देण्यासाठी आयात नियम शिथिल केले होते. चालू वर्षी सुद्धा पोल्ट्री उद्योगाला पशुखाद्याच्या वाढत्या किमतींपासून मदत वाचवण्यासाठी केंद्र सरकारने सरकारी आदेशानुसार, अतिरिक्त 5.5 दशलक्ष टन जनुकीय सुधारित (GM) सोयामील आयात करण्यास परवानगी दिली आहे. आदेशानुसार, शिपमेंट 30 सप्टेंबरपूर्वी आयात करणे आवश्यक आहे. 31 ऑक्टोबर 2021 रोजी संपलेल्या परदेशातील खरेदीची अंतिम मुदत संपण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी परवानगी दिलेल्या 12 लाखांच्या तुलनेत केवळ 6.5 लाख टन सोयामील आयात करण्याचे करार झाले होते. आता, सरकारने व्यापाऱ्यांना उर्वरित 5,50,000 टन जीएम सोयामील…
