नमस्कार शेतकरी बंधूनो,
वातावरणातील बदल लक्षात घेऊन वांगी पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. सध्या जास्त पाऊस होऊन गेला आहे. जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचून राहिल्यामुळे व आता ऊन पडत असल्यामुळे जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे त्यामूळे वांगी पीकांची मर होताना दिसून येत आहे. त्याच बरोबर अन्नद्रव्यांची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. म्हणजे शेतकरी बंधूनी दिलेल्या किंवा टाकलेल्या अन्नद्रव्यांपैकी खुप कमी प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होत आहेत. त्यामूळे दिलेली अन्नद्रव्य जास्तीत जास्त प्रमाणात कशी उपलब्ध होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वांगी पिकांतील या कालावधीत
➡️आळवणी : मर होऊ नये म्हणून मेटालेक्झील 35% = 500 ग्रॅम किंवा रिडोमिल गोल्ड = 400 ग्रॅम किंवा रोको = 400 ग्रॅम + ऑर्गेनिक कार्बन = 2 लिटर प्रति एकरी किंवा 200 लिटर पाणी यांप्रमाणे आळवणी घ्यावी.
➡️आळवणी: 00:42:47:2.8fe = 3 किलो + ग्रोथ मास्टर 500 मिली किंवा 13:40:13 = 4 किलो + मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो + ऑर्गेनिक कार्बन 1 लिटर किंवा 00:52:34 किंवा 00:60:20 = 4 किलो + न्युट्रीमिक्स 1 लिटर प्रति एकर याप्रमाणे कोणतेही एक आलटुन पलटून आळवणी घ्यावी. यामुळे वांगी पिकांची संतुलित वाढ होते, पाने हिरवीगार होतात, पानांची संख्या वाढते, मॅग्नेशियम वनस्पतींमध्ये फॉस्फरस वाहक म्हणून कार्य करते. पेशी विभाजन आणि प्रथिने निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. त्यामूळे फुटव्यांची संख्या वाढते, भरघोस वाढ होऊन अन्नद्रव्यांची निर्मीती भरपूर प्रमाणात होते त्यामूळे भविष्यात फुलगळ होत नाही, फळधारणा भरपूर प्रमाणात होते, एकंदरीत वांगी फळांचा विकास चांगला होतो फळे चांगली पोसतात. उत्पन्नात वाढ होते.
➡️फवारणी :-
वांग्यामधील रोग व किडींचे योग्य प्रकारे नियंत्रण करण्यासाठी खालील प्रमाणे फवारणी घ्यावी.
1) निमकरंज = 1.5 मिली + इमामेक्टीन बेंझाएट = 0.4 मिली + रिडोमिल गोल्ड = 2 ग्रॅम + प्राईम झाईम = 2 मिली 2) ड़ायमेथोएट 30% = 1 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8% = 0.4 ग्रॅम + एम 45 = 2 ग्रॅम + फ्लॉवरबूस्ट = 2.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्र घेऊन सायंकाळी 5 ते 6 च्या नंतर फवारणी घ्यावी. वरिल फवारणी सर्व रसशोषक किडींच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. तसेच पानांवर येणारी हानिकारक बुरशीचा नायनाट होतो. करपा, मिलीड्यू यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी व रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी मदत होते. पानांची रुंदी वाढून कार्यक्षमता वाढते. त्यामूळे वांगी पिकांची निरोगी पोषक वाढ होते.
शेतकऱ्यांचे नाव: श्री. गणपत सोपान कुंजीर साहेब.
गाव : थेऊर, ता: हवेली, जि: पुणे.
पिक व जात : वांगी पिक (ग्यालन वांगी).
लागवड दिवस: लागवडीपासुन 113 दिवसांचा प्लॉट.
एकुण क्षेत्र : 35 गूँठे.
एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन मार्गदर्शन…पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, भरघोस फुलधारणा, फळधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड संरक्षणासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍
🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
“Agriculture is My Love, Passion, Culture & Life.”
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141
FB Link: https://www.facebook.com/sp.bhosale2151
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳