सरकार देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार, अमित शहा यांची माहिती
सध्या दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत. सध्या दुधाला चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. सरकार शेतकर्यांना दुग्ध व्यवसायाकडे वळण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी सरकार शेतकर्यांना आर्थिक मदतही देते.
आता केंद्र सरकार देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये डेअरी सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, दुग्धव्यवसाय हे शेतकर्याच्या समृद्धीचे साधन बनवले जाऊ शकते. त्याची यंत्रणा सहकारी असावी. त्यामुळे शेतकर्यांची गरिबी दूर होऊ शकते. अनेकांचे जीवनमान यावर अवलंबून आहे.
त्यामुळेच केंद्र सरकारने येत्या ५ वर्षांत देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये दुग्धव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही पशूपालक स्टार्टअप इंडिया आणि नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. दुग्धव्यवसाय उघडण्यास इच्छुक असलेल्या शेतकर्यांना नाबार्ड २५ टक्क्यांपर्यंत सबसिडी देते. यामुळे शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे.
तसेच समान कामासाठी शेतकर्यांना ३३.३३ टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. नाबार्डच्या या योजनेसाठी शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपन्या अर्ज करू शकतात. शासनाच्या नियमानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे आता शेतकऱ्यांना हा एक व्यवसाय फायदेशीर असणार आहे.