कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे.
यामुळे याकडे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्वेच्छा मरणाच्या मागणीचं पत्र शेतकऱ्यांनी लिहलं आहे. राज्यातील कांदाप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.
तसेच स्वेच्छा मरणासाठी चांदवडमधील शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. अधिवेशनात कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितलं.
प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. अद्याप नाफेडकडून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झाली नसल्याची स्थिती दिसत आहे. विरोधी पक्षांनी कांदा दराच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरलं होतं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावं, नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु करावी.
तसेच कांद्याला चांगला दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करुन कांदा उत्पादकांना सहाय्य करावं अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने पत्र लिहून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान 600 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी किसान सभेने केली आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.