Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » आज अहमदनगर समवेत ‘या’ 8 जिल्ह्यात कोसळणार परतीचा पाऊस
हवामान

आज अहमदनगर समवेत ‘या’ 8 जिल्ह्यात कोसळणार परतीचा पाऊस

Neha SharmaBy Neha SharmaOctober 20, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सध्या राज्यात परतीचा पाऊस  सर्वत्र धुमाकूळ माजवत आहे. परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीसाठी आलेली पिके संकटात सापडली आहेत. हार्वेस्टिंग झाल्यानंतर देखील शेतमालाला मोठा फटका बसत आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी सोयाबीनच्या गंज्या वावरातूनच वाहून गेल्या. सोयाबीन प्रमाणेच काढण्यासाठी आलेल्या मका पिकाला देखील याचा फटका बसत आहे.

 

एवढेच नाही तर आत्ताच लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला ही याचा फटका आहे. तसेच काढण्यासाठी आलेल्या कापूस पिकाला देखील परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसत असून कापूस पिकाचा दर्जा आणि उत्पादन परतीच्या पावसामुळे कमी होणार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

 

एकंदरीत काय तर परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान अजूनही राज्यात परतीचा पाऊस चांगलाच बरसत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी पावसाची हजेरी राहिली. काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. दरम्यान आज देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (imd) नमूद केले आहे.

 

आज कोकणातील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. यामुळे निश्चितच अजून तरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मित्रांनो सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांच्या (farmer) डोळ्यासमोर त्यांच्या पिकांची राखरांगोळी होत आहे.

 

आधीच खरीप हंगामातील सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. आता अतिवृष्टी पासून बचावलेली पिके परतीच्या पावसाच्या भक्षस्थानी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना निश्‍चीतच हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

 

दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Unseasonal Rain : बेमौसम बारिश से ग्रीष्मकालीन फसलों को नुकसान।

April 11, 2024

Unseasonal Rain Alert : विदर्भ, मराठवाड़ा में बारिश, ओलावृष्टि की चेतावनी

April 11, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.