Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » वाफसा म्हणजे काय ?
शेतीविषयक

वाफसा म्हणजे काय ?

Neha SharmaBy Neha SharmaNovember 4, 2022No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कृषिविध्यापिठे खोटे बोलतात की , ”  मुळयाना पाणी पाहिजे  ” . पण नैसर्गिक सत्य हे आहे की , कोणत्याही झाडाच्या मुळीला पाणी नको . झाड पाणी पीत नाही . किंबहुना मुळी पाण्याला स्पर्शही करत नाही . मुळयाना पाणी नको तर वाफसा हवा . 

 

आपण बीजाम्रुत संस्कार केला , जीवाम्रुत देऊन आच्छादन केले पण मुळीजवळ वाफसा नसेल तर पिकाचि वाढ होणार नाही . ही चारही तत्वे ( बीजाम्रुत , जीवाम्रुत , आच्छादन व वाफसा ) एकमेकाशी इतके जुळलेले आहेत की यापैकी एकाला ही टाळता  येणार नाही . ” This is complete package of practices ” ही चारही तत्वे अंमलात आनाविच लागतील .

 

उदा . 1) गादी वाफ्यात कांदे किंवा लसुण लावतो . वाफ्याच्या काटाचे कांदे मोठे होतात कारण तेथे वाफसा असतो .

 

2) उंच सखल भाग – त्यात तूर पेरली – सखल भागातील तूर खुरटी व उंच भागातील तूर जोमदार दिसेल कारण वाफसा .

 

वाफसा जमिनीच्या पृष्ठभागाखालि मुळयाच्या परिसरात , दोन माती कणाच्या मध्ये ज्या पोकळया असतात त्या पोकळयामध्ये पाण्याचे अस्तित्व नको तर पोकळयामध्ये 50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे सन्मिश्रन हवे . या एकूण स्थितिला ”  वाफसा ” म्हणतात .

 

जेव्हा आपण सिंचनाचे पाणी देतो आणि पुढे 15 दिवस पाणी ( पाळी ) येणार नाही म्हणुन ‘ कुंभस्नान  ‘ घालतो त्यामुळे दोन मातीच्या कणामध्ये ज्या पोकळया असतात त्या सर्व पाण्याने भरून जातात व तेथील हवा निघुन जाते . . वाफा पाण्याने गच्च भरतो तेव्हा बुड- बुड असा जो आवाज येतो तो त्या निघुन जाणाऱ्या हवेचा असतो . परीणामी मुळया व जीवानुना oxygen मिळत नाही आणि जीवाणु मरतात व मुळया कुजतात .

 

मुळाकडुन अन्नाचि होणारी उचल ( Mineral Uptake ) थांबते त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात , वाढ खुंटते अर्थातच उत्पादनात घट . म्हणून पाणी एवढे दिले पाहिजे की , मातीच्या दोन कनामधिल पोकळयात पाणी साठणार नाही , तर त्या पाण्याची वाफ जमिनीतील उष्णतेने होईल (  जास्त पाणी दिले तर जमीन थंड पड़ते व वाफ बनत नाही ) व त्या पोकळयामध्ये  50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे सन्मिश्रन होईल एवढेच पाणी द्यावे . समजा जमिनीत अंगभुत उष्णता आहे जेणेकरुन त्या उष्णतेणे प्रति मिनट 2 ली पाण्याची वाफ होते तेव्हा 2 ली पाणी दिले तर वाफसा होईल . पण जर आपण 2 ली ऐवजी 4 ली पाणी दिले तर  2 ली पाण्याची वाफ बनेल व 2 ली पाणी तसेच राहील व वाफसा राहणार नाही . म्हणून जमिनीला एवढेच पाणी दिले पाहिजे जेणेकरून मुळीजवळ वाफसा राहील व अतिरिक्त पाणी गांडूळनि पाडलेल्या छिद्रातुन भूजल साठ्याकडे निघुन जाईल व वाफसा कायम राहील

 

जमिनीत वाफसा कसा निर्माण करावा ?

कोणत्याही झाडांची दुपारी 12 वा . ज्या ठिकाणी सावली पडते त्या सावलीच्या कडेला (सीमेवर  ) अन्न व वाफसा घेणारी मुळी असते . वाफसा व अन्न घेणारी मुळी सावलीच्या आतमध्ये अजिबात नसते . आपण जर सीमेवर पाणी दिले म्हणजेच मुळीच्या तोंडात पाणी ओतले तर तर अशावेळी वाफसा किती घ्यावा हे मुळीने ठरवले नाही तर आपण ठरविले . खरेतर वाफसा किती घ्यावा हे ठरविण्याचा अधिकार मुळीचा आहे , आपला नाही म्हणूनच मुळयाचा तोंडात त्यांच्या मनाविरुद्ध ओततो म्हणुन वाफसा निर्माण होत नाही .

तेव्हा सावलीच्या  बाहेर / सीमेपासुन 6″  बाहेर ड्रीपर टाकुन व निचरासाठी नाली काढुन दिली तर मुळी त्या पान्यापर्यन्त जाईल व पाहिजे तेवढा वाफसा निर्माण होईल .

सीमेच्या आतमध्ये जर पावसाचे पाणी किंवा सिंचनाचे पाणी भरले तर मुळयाजवळ पोकळया पाण्याने भरतात व मुळया सडतात , झाडांची सड़ होते , झाड पिवळे पडते . (  उदा . मोसन्बिच्या झाडावर डींक = खोडातून स्त्रव वाहने ) म्हणुन सावलीच्या आतमध्ये पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमा होऊ देऊ नये . ते पाणी ताबडतोब बाहेर काढुन देण्याची व्यवस्था करावी .

हे अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी झाडाच्या खोडापासुन झाडाच्या सीमेपर्यन्त उतारता थर देऊन पाणी काढुन दिले पाहिजे जेणेकरून पाणी निघुन जाईल मुळ सड़ होणार नाही .

सावलीच्या आतील पाणी काढुन दिले तरी अतिरिक्त ओलावा असतोच असतो . तो काढुन देण्यासाठी व वाफसा निर्माण करण्यासाठी सीमेपासून 6″  वर नाली काढतो तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीने जास्त दाबाकडूण कमी दाबाकडे म्हणजे मुळयापासून नालीत आपोआप उतरतो व मुळीजवळ वाफसा सतत  रहातो .

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.