संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुरू केलेला ‘ही मैत्री विचारांची’ या ग्रुपचे द्वितीय स्नेहसंमेलन दिनांक 31 मे व १ जून रोजी सप्तशृंगी गड वणी तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे आयोजित. या ग्रुपमध्ये नागपूर पासून कोल्हापूर पर्यंतचे सर्व पिके घेणारे शेतकरी आहेत या ग्रुपमध्ये द्राक्ष डाळिंब फळबाग भाजीपाला कापूस कडधान्य या सर्व प्रकारच्या पिकांचे मार्गदर्शन मोफत केले जाते. क्लब हाऊस या अप वर दररोज संध्याकाळी साडेसात वाजता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या विषयावर तज्ञ शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते. या ग्रुपवर दर शुक्रवारी आठवड्याचा हवामान अंदाज विजय जायभावे यांच्यामार्फत दिला जातो. अतिशय अचूक असा अंदाज शेतकऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेतातील कामे करण्यास सहजता येते त्याचबरोबर शासकीय योजना बाजार भाव अंदाज या ग्रुपवर दिले जातात हा ग्रुप पहाटे सहा वाजता सुरू होतो दिवसभर शेतकरी आपले काम करत असताना मोबाईल वर इतर शेतकऱ्यांशी चर्चा करतात आपले अडचणी समजावून घेतात खते औषधे पीक पद्धती नवीन वाण याविषयी ग्रुप मुळे सर्व शेतकरी अपडेट राहतात.
शेतामध्ये पिके घेत असताना उत्पादन खर्च कसा कमी होईल यासाठी सतत मार्गदर्शन केले जाते जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक खतांचा औषधांचा योग्य वापर करण्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले जाते जैविक सेंद्रिय रासायनिक असा मिलाप करून एकात्मिक शेती करण्यावर भर दिला जातो त्याचबरोबर सगळीकडे जमिनीचा पीएच वाढत चाललेला आहे क्षारता वाढत चालले आहे यासाठी हिरवळीचे खते वापरावर भर दिला जातो जेणेकरून सेंद्रिय कर्ब वाढवून उत्पादन खर्च कमी होऊन पिक उत्पादन वाढेल याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते द्राक्षामध्ये जैविक खता आणि औषधांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून निर्यात क्षम दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते असा हा ग्रुप शेतीसाठी अतिशय उपयोगी आहे या ग्रुपमध्ये महाराष्ट्र कर्नाटक एमपी छत्तीसगड येथील शेतकरी या ग्रुपमध्ये आहेत.
या कार्यक्रमाचा मूळ उद्देश ग्लोबल वार्मिंग मुळे जागतिक तापमान वाढ झाल्याने शेती उत्पादनामध्ये येणाऱ्या अडचणी व उपाय यावर चर्चा करणे तसेच या परिस्थितीमध्ये येणाऱ्या भविष्यकाळात शेती समोरील आव्हाने समस्या यांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केली पाहिजे शेती उत्पादनाला भाव न मिळणे शेतीत तोटा होणे यावर चर्चा करण्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ व शासकीय कृषी अधिकारी खासगी कंपनी प्रतिनिधी यांचे एकत्र चर्चासत्र आयोजित करणे व उपाययोजना शोधणे हा आहे
या ग्रुपच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून शेती मार्गदर्शन मिळवाव. क्लब हाऊस हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी तसेच कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी बाजीराव गागरे 9765271737 गणेश सलगर +91 90118 31802 यांच्याशी संपर्क साधू शकता.
‘हि मैत्री विचारांची’ शेतकरी समूह स्नेह संमेलन बुधवारी ३१ मी २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी, वणी देवस्थान सुदर्शन दहातोंडे व पत्रकार मुकुंद पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कृषी मार्गदर्शन गुरुवार दि. १ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजता, राज राजेश्वर बिल्डींग सप्तशृंगी गड, कळवण जि. नाशिक येथे होणार असून या वेळी माजी सनदी अधिकारी उदय देवळाणकार, कृषी सहसंचालक कृषीआयुक्तालय विनयकुमार आवटे, पत्रकार संदीप रामदासी, पत्रकार तथा बाजारभाव अभ्यासक दीपक चव्हाण, विभागीय सह-आयुक्त कृषीविभाग मोहन वाघ, कृषी जीवरसायन तज्ञ बायोमी टेकनोलोजीज डॉ. प्रफुल्ल गाडगे उपस्थितीत राहणार आहेत.