- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
ऊस पिकावर बुरशी, सूक्ष्मजंतू, अतिसूक्ष्म विषाणू, सूत्र कृमी, अन्नद्रव्याची कमतरता, परोपजीवी वनस्पती यामुळे रोग होतात. आपल्याकडे जवळजवळ ३० रोगांची नोंद झालेली आहे. उसावर बेण्याद्वारे काणी, गवताळ वाढ, खोड-कुजव्या, पांगशा फुटण, मोझॅक, वाढ खुंटण, ऊस रंगने इत्यादी रोग येतात. तर हवेद्वारे पसरणारे रोग म्हणजे पोक्का बोंग, तांबेरा, पानावरचे ठिबके आणि जमिनिद्वारे पसरणारे रोग म्हणजे अननस ( पाईनॅपल ) कांडी – कुज, मुळकुज आणि मर. उसावरची काणी – चाबूक काजळी हा रोग सर्वांना परिचित आहे. अशी चाबूक काणी प्लास्टिकच्या पोत्यात काढून घेवून ते सर्व बेत मुळासह उपटून जाळून टाकाव, बेण्यास उष्णजल प्रक्रिया करावी. तसंच १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम + १०० लिटर पाण्यात कांडीप्रक्रिया…
रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा अत्यल्प व अनियमित वापर, सूक्ष्म अन्नद्रव्युक्त खतांचा अत्यल्प वापर, जमिनीला विश्रांती न देणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे, नेहमी एका जमिनीतून एकाच प्रकारच्या पिकाचे उत्पादन घेणे, जमिनीचा सामू जास्त असणे, मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त असणे इ. अनेक कारणांमुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीमध्ये उपलब्धता कमी जाणवते. त्यांच्या कमतरतेमुळे पीकवाढीवर अनिष्ट परिणाम दिसून येतो. पर्यायाने ऊस व साखर उत्पादनात घट येते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे सूक्ष्म अन्नद्रव्यांबाबतच्या झालेल्या संशोधनावरून असे आढळून आले आहे, की राज्यातील उसाखालील जमिनींमध्ये लोह, मॅंगनीज, जस्त आणि बोरॉन या चार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. माती परीक्षण अहवालानुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपाययोजना…
पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशी पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांच्या मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता पिकास निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्याच शेतात तयार होणारी सेंद्रिय खते देणे ही एक शास्त्रीय तशीच काळाची गरज आहे. अलीकडे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे रासायनिक खतांचा वापर भरपूर वाढला आहे. दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते उपलब्ध होत नाहीत. हिरवळीचे परंतु हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडण्यासाठी क्षेत्राची उपलब्धता, हिरवळीचे पीक व नंतर घ्यावयाचे पीक यासाठी पुरेसा वेळ हवा असतो. महाराष्ट्रात जवळजवळ…
कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असावी लागते. उष्ण दिवस आणि थंड रात्र याप्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्यास उपयुक्त असते. कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें.मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त…
गन्ने के उत्पादन और उत्पादकता को कम करने वाले रोगों और कीटों को नियंत्रित करने के लिए निराई प्रोसेसिंग आवश्यक है। वर्तमान में रासायनिक उर्वरकों की कीमतें आसमान छू रही हैं और रासायनिक उर्वरक अक्सर समय पर उपलब्ध नहीं होते हैं। ऐसे मामलों में, गन्ने के लिए एसीटोबैक्टर और फास्फोरस-डीकंपोजिंग बैक्टीरिया का प्रसंस्करण आपको रासायनिक उर्वरकों में बचा सकता है। गन्ने में शुद्ध, स्वस्थ और अच्छे डंठल के उपयोग से भी गन्ने के उत्पादन में 10 से 15 प्रतिशत की वृद्धि देखी गई है। गन्ने के उत्पादन में गिरावट का मुख्य कारण शुद्ध, स्वस्थ और अच्छे गन्ने की कमी है।…
अमेरिकी कपास 2021/22 आपूर्ति और मांग पूर्वानुमान पिछले महीने से अपरिवर्तित हैं। उच्च कपास उत्पादकों द्वारा प्राप्त विपणन वर्ष की कीमत हाल ही में उच्च कीमतों को दर्शाते हुए 1 प्रतिशत की वृद्धि के साथ रिकॉर्ड 91 सेंट प्रति पाउंड होने का अनुमान अमरीकि कृषी विभाग ने लागया है (USDA) है। फरवरी 2022 अपलैंड फार्म की कीमत रिकॉर्ड 100 सेंट प्रति पाउंड पर पहुंच गई। वैश्विक 2021/22 कपास के अनुमानों में महीने-दर-महीने परिवर्तन भी छोटे हैं, उच्च उत्पादन और कम खपत के परिणामस्वरूप अंतिम स्टॉक में 800,000-गठरी की वृद्धि के साथ 83.4 मिलियन हो गई है। पाकिस्तान और ग्रीस के…
भारतीय ट्रैक्टर उद्योग ने सबसे अधिक वार्षिक उत्पादन और घरेलू बिक्री दर्ज करने के एक साल बाद, 2021-22 में घरेलू बिक्री में छह प्रतिशत की गिरावट दर्ज की है। हालांकि, उद्योग ने वित्त वर्ष 22 के दौरान अपने अब तक के सबसे अधिक निर्यात की मात्रा हासिल की। वित्त वर्ष 22 के लिए कुल घरेलू मात्रा 8,42,266 इकाई रही, जबकि पिछले वित्त वर्ष में यह 8,99,407 इकाई थी, जो 6.4 प्रतिशत की गिरावट थी। ट्रैक्टर एंड मैकेनाइजेशन एसोसिएशन (टीएमए) द्वारा उपलब्ध कराए गए आंकड़ों के अनुसार, 2020-21 में 9,65,231 इकाइयों की तुलना में कुल उत्पादन भी गिरकर 9,61,100 इकाई हो…
सोयाबीन हे आपल्याकडील महत्त्वाचे तेलबिया पीक. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राष्ट्रीय सोयाबीन संचालनालय कार्यरत आहेत. या संचालनालयाच्या माध्यमातून सोयाबीन पिकाच्या विविध जाती, पीकपद्धती, उत्पादनवाढ आणि प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत संशोधन केले जाते. संचालनालयाने देशातील प्रत्येक विभागाच्या गरजेनुसार विविध जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये अधिक उत्पादनक्षम, तेलाचे अधिक प्रमाण असलेल्या जातींची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने पेंडीच्या गुणवत्तेवरही संशोधन करण्यात येत आहे. येथील संशोधकांनी सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा-सरी पद्धतीचा अवलंब, आंतरपीक पद्धती, सुधारित लागवड तंत्राबरोबरीने एकात्मिक खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड-रोग नियंत्रण पद्धती विकसित केली आहे. विविध चर्चासत्रे, शिवारफेरीच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा प्रसार देशभर करण्यात येतो. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. केवळ उत्पादनवाढीवर…
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत . कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) निम्मी आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो . याशिवाय सोयाबीनपासून सोयामिल्क ,सोया…
भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे . जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत हापूस, केशर, या वाणांची लागवड करण्यात मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. राज्यातून निर्यात होणा-या फळांमध्ये द्राक्ष, आंबा, डाळींब, लिंबूवर्गीय फळे आणि काजू यांचा मोठा वाटा आहे. सध्याच्या काळात निर्यातक्षम हापूस आणि केशर आंब्याला परदेशात मागणी वाढत आहे. अांब्याचा पल्प हा मोठया प्रमाणात निर्यात होत आहे. ही निर्यात वाढविण्यासाठी दर्जेदार उत्पादनाबरोबरच त्यासाठी लागणा-या गुणवत्ता प्रमाणकाकडेही तेवढेच लक्ष शेतक-यांना द्यावे लागणार आहे. भारताच्या जागतीक व्यापार संघटनेच्या सदस्यत्वामुळे आणि कृषि क्षेत्राच्या जागतीक व्यापारामधील समावेशामुळे फळांच्या निर्यातीसाठी चांगल्या संधी निर्माण झालेल्या आहेत. विशेषत:…
