अजित घोलप, एकरी 100 टन + टोमॅटो उत्पादन घेणारे प्रयोगशील शेतकरी
महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर परिणाम झाला आहे.असं असताना हि अजित घोलप यांनी एकरी 100 टन + टोमॅटो उत्पादन घेतलं आहे.
अजित घोलप यांनी cmv,tuta यांकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहणे आवश्यक असल्याचं ते म्हणतायत. योग्य नियोजन शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्व माहिती घेऊन पिकाचे व्यवस्थापन केल्यास जगातील कोणताही व्हायरस,किड आणि रोग काही करू शकत नाही.
यावर्षी वातावरणात खूपच चढ उतार आहेत ,सगळे ऋतू सोबतच म्हणता येईल. टोमॅटो पिकासाठी सर्वोत्तम तापमान 21 ते 24 समजले जाते. आर्द्रता 65 ते 75 टक्के आदर्श मानले जाते.साधारणपणे स्वच्छ सूर्यप्रकाश 6 ते 8 तास आवश्यक असतो. मागील 3 महिन्याचे तापमान ,आर्द्रता आणि इतर नैसर्गिक घटकांचा अभ्यास केल्यास सर्व फॅक्टर खूप जास्त प्रमाणात कमी जास्त आहेत.
सध्याचे हायब्रीड हे उच्च उत्पादन देणारे आहेत.अजित घोलप यांनी स्वतः मागील वर्षी 110 टन उत्पादन फक्त 1 एकर मध्ये मिळवले होते. उच्च उत्पादन घेताना जमिनीची निवड, तयारी भरपूर सेंद्रिय घटक ,दर्जेदार निविष्ठा जसे की रासायनिक आणि जैविक खते, drip irrigation,malching फिल्म, दर्जेदार आणि निरोगी रोपे इत्यादी घटक खूप जबाबदार असतात. आणि याची योग्य सांगड अजित घोलप यांनी घातली. त्यासोबतच कुशल मनुष्यबळ, कामे वेळेत, योग्य पद्धतीने आणि कमी मजुरी मध्ये करणे गरजेच असल्याचं ते सांगतात. यासोबतच त्या पिकाची वाढ, वाढीचे टप्पे, पिकास संभावित रोग ,किड यांची माहिती असणे आवश्यक आहे. शेतकरी खूप प्रमाणात ऑक्साईड फॉर्म मधील खते गरज नसताना देतात ,3 कंपन्यांची शेदुल्ड फॉलो करतात.
यावर्षी अजित घोलप यांना cmv बाबत एक नवीन माहिती मिळाली, बऱ्याच जमिनींचे EC वाढले आहेत त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण होत नाही. हे सर्व होतच राहणार आपली जमीन पैलवान ठेऊन तज्ञ मंडळी संपर्कात राहून आणि प्रॅक्टिकल निर्णय घेण्यास शेतकरी शिकले तर खूप क्रांती घडवून येईल.
अजित घोलप यांनी डॉ. प्रफुल्ल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्व माहिती घेऊन पिकाचे व्यवस्थापन करत व्हायरस,किड आणि रोग यावर मात करून यशस्वी उत्पादन घेऊन दाखवलं आहे.